वर्धा, दि.11- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे माजी सैनिक / पत्नी तसेच त्यांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी विशेष गौरव पुरस्कार योजने अतर्गत राज्यातून 40 पाल्यांना गुणवत्ता यादीनुसार पुरस्कृत करण्याची तरतूद आहे.
ज्या माजी सैनिकांची पाल्ये वर्ष 2011-12 सत्रात इयत्ता दहावी मध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे, ईयत्ता बारावी मध्ये 90 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणे, विविध खेळ, साहित्य, संगित, गायन, वादन व नृत्य यामध्ये राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त करणे, नैसर्गीक आपततीमध्ये बहुमोल कामगीरी करणे व सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणे, कृषी क्षेत्रात भरघोस उत्पादन काढणा-या शेतक-यास शासनातर्फे पारितोषिक व गौरवपत्र पुरसकाराने सन्मानीत करण्यात येते.
अधिक माहितीसाठी व अर्जदारांनी कागदपत्रासह दिनांक 20 सप्टेंबर 2012 पर्यंत
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात संपर्क करावे.
000000
No comments:
Post a Comment