वर्धा, दि. 11- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर , विभागीय मंडळ यांचेमार्फत दिनांक 4 ते 23 ऑक्टोंबर 2012 या कालावधीत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षा ( 12 वी ची परिक्षा ) आणि दिनांक 4 ते 17 ऑक्टोंबर 2012 या कालावधीत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा ( 10 वी ची परिक्षा) आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर परिक्षांचे संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे, परिक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नये यासाठी परिक्षा कालावधीत वर्धा जिल्ह्यातील परिक्षा केंद्राचे परिसरात फौजदार प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.
जिल्हादंडाधिकारी जयश्री भोज यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यात होणा-या उच्च माध्यमिक व माध्यमिक परिक्षांसाठी दिनांक 4 ऑक्टोंबर ते 23 ऑक्टोंबर 2012 पर्यंत परिक्षांच्या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळात जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्राचे 100 मीटरचे परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 लागू करण्याचा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. सदर परिक्षांकरीता वर्धा जिल्हयातील सर्व परिक्षा केंद्रांचे 100 मीटरचे परिसरात सर्व झोरॉक्स, मोबाईल, एसटीडी किंवा आयएसडी, फॅक्स, संगणक, ई-मेल इंटरनेट इत्यादी ईलेक्ट्रॉनिक्स आदी सुविधा व उपकरणांचे वापरावर व सदरबाबतची केंद्रे सुरु राहण्यांवर निर्ब्ंध , प्रतिबंध लावण्यात आले आहे. सदर आदेशाची कोटेकारेपणे अंमलबजावणी करण्याकरीता सर्व संबंधीतांनी कटाक्षाने दक्षता घ्यावी. असे जिल्हा दंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात नमुद आहे.
00000
No comments:
Post a Comment