वर्धा, दि. 11- जातीय सलोखा योजना अंतर्गत वर्धा जिल्ह्यात एक गांव एक गणपती व ज्या गणेश उत्सव मंडळानी उत्कृष्ट देखावे तयार केले अशा संस्थांना पोलीस विभागातर्फे शासनहित कार्यक्रम व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविणे, जनजागरण, प्रबोधन, गांव स्वच्छतेबाबत कार्यक्रम घेवून गणेश उत्सव दरम्यान शहरात, गावांत शांतता व सुव्यवस्था राखेणेकरीता मदत करावी. सर्व गणेश उत्सव मंडळांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून प्रशासनाला मदत करावी.
त्याकरीता आपआपल्या पोलीस स्टेशन स्तरावर शांतता समिती, तंटामुक्ती, सामाजिक कार्यकर्ता व सर्व धर्माचे प्रतिष्ठित नागरिक यांना घेवून जातीय सलोखा समिती गठीत करण्यात येत आहे.
समितीतर्फे सर्व गणेश उत्सव मंडळाची पाहणी करुन जातीय सलोखा येाजना अंतर्गत क्रमांक 1 व 2 क्रमांकचे गणेश उत्सव मंडळाना बक्षीस देवून मंडळाचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी निरीक्षणा करीता येणा-या समितीला सर्वोतोपरी मदत करुन व जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी असे पोलीस अधिक्षक अविनाशकुमार, अपर पोलीस अधीक्षक टी.एस.गेडाम यांनी आवाहन केले आहे.
00000
No comments:
Post a Comment