वर्धा, दि. 11- स्त्रिभ्रृण हत्या होणे हा विषय समाजासाठी चिंतणाचा असून, स्त्रिभ्रृण हत्येला आळा बसावा यासाठी लेक वाचवा अभियाना अंतर्गत समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ‘लक्ष्मी आली घरा’ लिंगोत्तर प्रमाणा बाबतच्या फलकाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांचे शुभहस्ते करण्यात आले.
जिल्हा परिषद येथील आरोग्य विभागाच्या आरोग्य समितीच्या वतीने नुकतेच दिनांक (7 सप्टें.) रोजी फलकाचे उदघाटन उपाध्यक्ष संजय कामनापुरे , आरोग्य सभापती प्रा. उषाकिरण थुटे, जि. सदस्य मोरश्वर खोडके, मनिषाताई वरकड, उज्वलाताई राऊत, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, महिला बालकल्याण अधिकारी डॉ.एस.जे. निमगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
000000
No comments:
Post a Comment