बंग कुटूंबियांचे गृहमंत्र्याकडून
सांत्वन
वर्धा दि.10- जेष्ठ
गांधीवादी विचारवंत प्रा.ठाकूरदास बंग यांनी आयुष्यभर गांधी विचाराला वाहून
घेतानांच समाजसेवेच्या माध्यमातून निरामय जीवन जगले अशा भावना गृहमंत्री
आर.आर.पाटील यांनी आज चेतना विकास संस्थेच्या परिसरातील निवास्थानी श्रीमती
सुमन बंग यांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. त्याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.
जेष्ठ गांधीवादी विचारवंत प्रा. ठाकुरदास बंग यांचे नुकतेच अलोडी येथील
अशोक बंग यांच्या निवास्थानी निधन झाले. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सकाळी बंग
कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या निवास्थानी भेट दिली.स्वर्गीय
ठाकुरदास बंग यांच्या फोटोस गुलाबपुष्प अर्पण करुन आपली भावपूर्ण आदरांजली
वाहिली.
महात्मा गांधी यांचे विचार पुढे नेण्यामध्ये
स्वर्गीय ठाकुरदास बंग यांचे महत्वाचे योगदान असून संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी
त्यांनी वाहिले असल्याची भावनाही यावेळी व्यक्त केली.
स्वातंत्र्य चळवळी मध्ये सक्रीय सहभाग
घेतांना आचार्य विनोबा भावे यांच्या भुदान चळवळीसोबत सर्वोदय कार्यासाठी आपले जीवन वाहिले होते. संपूर्ण क्रांती
आंदोलन,स्वातंत्र्य आंदोलन यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
स्वर्गीय ठाकुरदास बंग यांच्या पत्नी
सुमनताई बंग यांचे आशिर्वाद घेतल्यानंतर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मृत्यूपूर्वी
त्यांच्या प्रकृती स्वास्थाची माहिती घेतली. तब्बल पंचवीसवर्षे मधुमेहासारखा
आजार असूनही समाजसेवेत कधीही खंडपडू दिला नाही. महिन्यापूर्वी पडल्यामुळे पायाला
फ्याक्चर झाले होते त्यामुळे त्यांची हालचाल बंद झाली होती. शेवटी आठ दिवस
बोलने बंद होते आणि झोपेतच त्यांचे निधन झाले. आयुष्यात कुठलिही इच्छा किंवा
अपेक्षा त्यांची नव्हती असे यावेळी अशोक बंग यांनी सांगितले.
यावेळी डॉ. आकाश बंग श्रीमती निरंजना बंग
व संपूर्ण बंग कुटूंबीय उपस्थित होते. आमदार सुरेश देशमुख, सुनिल राऊत आदिनीही स्वर्गीय
ठाकुरदास बंग यांच्या प्रतिमेस गुलापुष्प अर्पण करुण आदरांजली वाहिली.
0000
No comments:
Post a Comment