Monday 1 October 2012

निर्मल भारत अभियान 56 गावांचा समावेश - शेखर चन्‍ने


                              आजपासून  शुभारंभ
       वर्धा, दि. 1 -  निर्मल भारत अभियान  कार्यक्रमांमध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा  समावेश झाला असून, अभियानाचा शुभारंभ उद्या मंगळवार दिनांक  2 ऑक्‍टोंबर रोजी सकाळी  8 वाजता   देवळी तालुक्‍यातील   डिगडोह ग्रामपंचायतीपासून  होत असल्‍याची  माहिती  मुख्‍य  कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने यांनी दिली.      
         निर्मल भारत अभियानाचा शुभारंभ  जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष  नानाभाऊ ढगे यांच्‍या हस्‍ते  होणार असून यावेळी   उपाध्‍यक्ष  संजय कामनापुरे, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने, उपमुख्‍य कार्यकारी  अधिकारी  आर.एम.भुयार , कार्यकारी अभियंता बी.एल. बोरकर आदी उपस्थित  राहणार आहेत.
        निर्मल भारत  अभियानामध्‍ये  वर्धा जिल्‍ह्यातील 56 गावांचा समावेश असून, यामध्‍ये  आर्वी तालुक्‍यातील  6, हिंगणघाट 16, समुद्रपूर 11, वर्धा 7, कारंजा 3, देवळी 7,  सेलू 5 , आर्वी 6 व आष्‍टी  तालुक्‍यातील  1 ग्रामपंचायतीचा  समावेश आहे. या कार्यक्रमा अंतर्गत पर्यावरण संतूलन, हागणदारी मुक्‍त गाव,  सौचालयाचा वापर, शुध्‍द पाणी, स्‍वचछता व पाण्‍याची साठवणूक या ठळक मुद्दयावर  जनजागृतीपर मोहीम राबविण्‍यात येणार आहे.  
       निर्मल भारत अभियान कार्यक्रम जिल्‍हा पाणी  स्‍वचछता मिशन , पाणी पुरवठा विभाग, निर्मल भारत अभियान व गट संसाधन केन्‍द्र यांच्‍यातर्फे  राबविण्‍यात येणार आहे. यावेळी जनजागृतीसाठी  प्रभातफेरी , पथनाट्य , कलापथक या माध्‍यमातून  वातावरण निर्मिती करुन गावक-यांना मार्गदर्शन करण्‍यात येणार असल्‍याची   माहितीही   मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने यांनी दिली.
                                                00000

No comments:

Post a Comment