वर्धा दि.2- राष्ट्रपिता महात्मा
गांधी यांच्या जयंती दिनी जागतिक अहिंसा दिन साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक
व शैक्षणिक संघटनांच्या सहकार्याने महात्मा गांधी पुतळा ते सेवाग्राम येथील
आश्रमापर्यंत पदयात्रा काढण्यात आली.
शांती एकता व कृतीशील नागरिकांची चळवळ निर्माण करणे हा मुख्य
हेतू पदयात्रेच्या आयोजनाचा आहे. नेहरु युवा केंद्रातर्फे पदयात्रा काढण्यात आली
होती.
महात्मा गांधी पुतळ्यापासून निघालेल्या ह्या पदयात्रेत ज्येष्ठ
नागरिक,स्वतंत्रा संग्राम सैनिक,विविध संघटनांचे पदाधिकारी व तरुण-तरुणी मोठ्या
संखेने सहभागी झाले होते.
या पदयात्रोच्या
आयोजनात गांधी विचार परिषद,नेहरु युवा केंद्र,वर्धा होमगार्डस्, निसर्ग सेवा
समिती,लॉयन्स क्लब, गायत्री परिवार,प्रजापती ब्रम्हकुमारी,शिक्षा
मंडळ,महिलाश्रम, प्रहार समाज जागृती संस्था,राष्ट्रीय सेवा योजना गो.से.वाणिज्य
महाविद्यालय, प्रियदर्शनी महिला विद्यालय, एन.सी.सी. कॅडेट्स मोठ्या संखेने सहभागी
झाले होते.
सेवाग्राम
आश्रमात बापुकूटी परिसरात संमेलन आयोजित करुन ह्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात
आला. ह्यावेळी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.म.गडकरी, गांधी विचार
परिषदेचे संचालक भरत महोदय,पवनार आश्रमाचे गौतमभाई बजाज, अरुण लेले,नेहरु युवा
केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संजय
माटे,लॉयन्स क्लबचे नरेडी, होमगार्डचे मोहन गुजरकर, निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर
बेलेखोडे,एन.एस.एस.चे जिल्हा समन्वयक रफीक शेख आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment