Saturday 30 July 2016

प्रधानमंत्री पिक विमा योजनेला 2 ऑगस्‍ट  पर्यंत मुदत वाढ
 वर्धा,दि 30- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम 2016 मध्‍ये राबविण्‍यात येत आहे. या योजने अंतर्गत खरिप हंगामाकरिता शेतक-यांना सहभागी होण्‍यासाठी 2 ऑगस्‍ट पर्यंत मुदत वाढ देण्‍यात आली आहे.

पुर्वी खरीप हंगामाकरिता शेतक-यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्‍याची अंतिम दि.31 जुलै  होती. केंद्र शासनाने ही अंतिम मुदत वाढवून 2 ऑगस्‍ट केलेली आहे. याचा इच्‍छुक शेतक-यांनी लाभ घेवून आपला सहभाग नोंदवावा असे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांनी कळविले आहे. 

No comments:

Post a Comment