प्रधानमंत्री पिक विमा योजनेला 2 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ
वर्धा,दि 30- प्रधानमंत्री पिक विमा
योजना खरिप हंगाम 2016 मध्ये राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत खरिप
हंगामाकरिता शेतक-यांना सहभागी होण्यासाठी 2 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली
आहे.
पुर्वी खरीप हंगामाकरिता शेतक-यांना पिक विमा योजनेत
सहभागी होण्याची अंतिम दि.31 जुलै होती. केंद्र
शासनाने ही अंतिम मुदत वाढवून 2 ऑगस्ट केलेली आहे. याचा इच्छुक शेतक-यांनी लाभ
घेवून आपला सहभाग नोंदवावा असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती
यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment