महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.30 जूलै 2011
----------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 30- कारंजा तालुक्यातील हेटीकुडी व चंदेवाणी या ग्रामीण क्षेत्रातील शेतक-यांच्या शेतातील पिक परिस्थिती आणि फळबागेची पाहणी नुकतीच (दि.26जुलै) जिल्हा कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाटे, सेलसुरा कृषि केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे व तालुका कृषि अधिकारी जुमडे यांनी प्रक्षेत्राला भेट दिली व शेतक-यांसोबत संवाद साधला.

कृषि अधिक्षक ब-हाटे म्हणाले की, शेतक-यांना पिकाच्या नुकसान भरपाई आवश्यक आहे की, शेतीच्या निगडीत साहित्याची आवश्यकता आहे किंवा शेतक-यांना तंत्रशुध्द तंत्रज्ञानाचया मार्गदर्शनाची गरज आहे यावर शेतकरी म्हणाले की, आम्हाला शेतीच्या माहितीपूर्ण नवनविन तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. ही माहिती शेतक-यांसाठी मोलाचा अनमोल ठेवा असतो. पीक प्रक्रियेत व उत्पादन वाढीसाठी माहितीपूर्व नवनवे तंत्रज्ञान शेतीसाठी सहाय्यभूत ठरत असते.
शेतक-यांशी संवाद साधताना डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले की, शेतक-यांचे मुख्य पीक कपासी, सोयाबीन, तुर,फळ पीक संत्रा यावर येणारे रोग, किडी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, मृद व जल संधारण व निचरा व्यवस्थापन , तण नियंत्रण याबाबत सखोल चर्चा होऊन शेतक-यांचे शंकासमाधान करण्यात आले.
अधिक माहिती देतांना नेमाडे म्हणाले की, सद्यास्थितीमध्ये कपासी पिकावर रस शोषन करणा-या किडीचा व सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व उंटअळीचा प्रादुर्भाव अत्यल्प आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या किड किंवा किटकनाशकाची फवारणी करु नये व फवारणीवर होणारा अनावश्यक खर्च टाळावा. त्याचप्रमाणे या किडीविषयी जागरुक राहून किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास रस शोषण करणा-या किडींसाठी व चक्रभुंग्यासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिली किंवा अॅसिटामीप्रीड 20 टक्के प्रवाही 2 ग्रॅम किंवा मिथाईल डेगॅटॉन 25 टक्के प्रवाही 8 मिली यापेकी कोणतेही एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
त्याचप्रमाणे सोयाबीन पीकावरील हिरव्या उंट अळीच्या बंदोबस्तासाठी क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 20 मिली किंवा ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 10 मिली यापेकी एक किटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. निव्वळ किटकनाशकावर अवलंबून न राहता एकात्मिक किड व रोग नियंत्रण पध्दतीचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी संवाद करताना सांगितले.
यावेळी शेतक-यांच्या पीक प्रक्रियेबाबत येणा-या अडचणी व समस्यांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच इंगळेताई उपस्थित होत्या.
यावेळी गावातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment