वर्धा,दि.29-वर्धा जिल्हा परिषदे अंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षिका या सवंर्गातील रिक्त असलेल्या पदाकरीता दिनांक 6 मार्च 2010 रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल दिनांक 28.2.2012 रोजी जाहीर करण्यात आला असुन लेखी परीक्षेत गुणानुक्रमे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक.6 मार्च 2012 रोजी मा.जिल्हाधिकारी वर्धा यांचे कक्षात सकाळी 11.00 वाजता पासुन आयोजित करण्यात आल्या आहेत.
लेखी परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद कार्यालय वर्धा व मा.जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा चे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आला आहे. लेखी परीक्षेतून मुलाखतीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी दिनांक. 6 मार्च 2012 रोजी जिल्हाधिकारी वर्धा यांचे कक्षात स्वखर्चाने सकाळी 10.00 वाजता उपस्थित रहावे असे महिला व बाल विकास विभागामार्फेत कळविण्यात येत आहे. मुलाखतीचे पत्र स्वंतत्रपणे पाठविण्यात आले आहे. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाक)जिल्हा परिषद, वर्धा कळवितात.
0000
No comments:
Post a Comment