वर्धा,
दि.3- सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती,
शारिरिकदृष्ट्या मनोदुर्बल, अपंग, कृष्ठरोगी इत्यादीच्या कल्याणासाठी कार्य करणा-या व्यक्ती
व सामाजिक, शिक्षण,आरोग्य, शेती, वने, पर्यावरण, सहकार, उद्योग,संस्कृती साहीत्य,
अन्याय व अंधश्रध्दा निर्मुलन क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक संस्था यांना
प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजभूषण पुरस्कार देण्यात येतो. व्यक्तीसाठी रुपये 15 हजार रोख व सन्मानपत्र
आणि संस्थेकरीता रुपये 25 हजार रोख व
सन्मापत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
2012-13 या वर्षाच्या डॉ. बाबासाहेब
आंबेडकर दलित मित्र पुरस्कारासाठी दिनांक 25 जानेवारी 2013 पर्यंत इच्छुक व्यक्ती
व संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत
आहेत. अर्जदार व्यक्तीचे वय पुरुषासाठी
किमान 50 वर्षे व स्त्रियासाठी किमान 40 वर्षे इतके असावे. अर्जदार व्यक्तीचे
सामाजिक क्षेत्रात किमान 15 वषे्र व सामाजिक संस्थेचे किमान 10 वर्षे कार्य असणे आवश्यक आहे.
अर्जदार व्यक्ती खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य अथवा कोणतीही पदाधिकारी
नसावी. तसेच अर्जदार संस्था राजकारणापासून अलिप्त असावी.
पुरस्कारासाठी अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी
सहारय्यक आयुक्त, समाज कलयाण सामाजिक न्याय
भवन वर्धा या कार्यालयास कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा.
प्रस्ताव 3 प्रतीत सादर करावा. प्रस्ताव स्विकारण्याची अंतिम मुदत 25 जानेवारी
2013 आहे. या तारखेनंतर आलेले प्रस्ताव स्विकारले जाणार नाहीत. असे सहाय्यक आयुक्त,
समाज कल्याण, वर्धा कळवितात.
00000
No comments:
Post a Comment