वर्धा,
दि.3 – शहर वाहतुक शाखा वर्धा येथे दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2013 पर्यंत
रसता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या रस्ता सुरक्षा अभियाना दरम्यान
दि. 5 जानेवारी 2013 रोजी रस्त्यावरील अपघाताची कारणे जबाबदारी व उपाय या
विषयावर निबंध स्पर्धा, दि. 7 जानेवारी 2013 रोजी दारु पिऊन वाहन चालविल्याने
अपघात कसे होतात या विषयावर चित्रकला स्पर्धा, तसेच दि. 9 जानेवारी 2013 रोजी वाहतूक या विषयावर प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित आहे.
वाहतुक या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा,
दिनांक 11 जानेवारी 2013 रेाजी शालेय जीवनात सुरक्षित वाहनाचा उपयोग काळाची गरज आहे
किंवा नाही या विषयावर वक्तृत्व
स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार असून, स्पर्धकाला योग्य बक्षिस दिले
जाणार आहे.
शाळेतील मुख्याध्यापकांनी वक्तृत्व
स्पर्धेकरीता एक मुलगा, एक मुलगी व इतर 3 स्पर्धांकरीता प्रत्येकी 10
विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जाईल. असे पोलीस निरीक्षक शहर वाहतुक शाखा वर्धा
कळवितात.
No comments:
Post a Comment