वर्धा,दि.2-
वर्धा जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर दिनांक.3.1.2013 ते 12.1.2013 पर्यंत
राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियान
कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीनिमित्ताने दिनांक.3.1.2013 रोजी दुपारी 2.00 वाजता विकास भवन, वर्धा येथे
सदर अभियानाचा शुभारंभ होणार असून जि.प.अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे याच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी एन.नवीन सोना,
पोलीस अधिक्षक अविनाशकुमार , जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने यांच्या
प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.
या
कार्यक्रमामध्ये महिला व बालकांविषयक कायदे तसेच योजनांवर माहिती देवून जाणीव
जागृती करण्यात येईल असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा गुरसगे यांनी
कळविले आहे.
No comments:
Post a Comment