वर्धा
दि.5- वर्धा जिल्ह्यातील बेरोजगार युवक व युवती करीता विज्ञान व तंत्रज्ञान
विभाग,भारत सरकार,नवी दिल्ली यांनी पुरस्कृत केलेला प्रशिक्षण उद्योजकता विकास
प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन वर्धा येथे दिनांक 15 जानेवारी ते 15
फेब्रुवारी,2013 पर्यंत केलेले आहे. सदर प्रशिक्षणामध्ये विविध कार्यक्रमात मुख्यतेकरुण
शिकविले जातील उद्योजकतेचा परिचय, उद्योजकतेची प्रक्रीया, व्यवसाय संकल्पना,
संधीचा शोध आणि विल्शेषण, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास(दोन दिवसीय निवासी)
बाजार पेठेविषयी पाहणी व माहितीचे संकलन, संभाषण कौशल्य, नविन व्यवसाय करण्यासाठी
विविध योजनांची माहिती प्रकल्प अहवाल तयार करणे, पॅकेजिंग व गुणवत्तेचे
नियंत्रण, विपणन आणि विक्रीपत्रात सेवा तसेच विविध क्षेत्रातील उद्योजक तसेच
संभाव्य उद्योजकांना माहिती, प्रेरणा व मार्गदर्शन देवून स्वतःचा व्यवसाय सुरु
करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सदर प्रशिखणामध्ये ज्यांना
निर्मितीचा उद्योग क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याची तीव्र इच्छा आहे. त्याचबरोबर
असे विद्यमान उद्योजक की ज्यांची आपल्या क्षेत्रामध्ये उद्योजकता विकास
कार्यक्रमाव्दारे विस्तार आणि आधुनिकता आणण्याची र्इच्छा आहे. याशिवाय विज्ञाण
आणि तंत्रज्ञान पदविधर तसेच पदविधारक सध्या नोकरीत असलेले व स्वतःचा व्यवसाय
सुरु करु इच्छिणारे विज्ञान शाखेतील युवक व युवती करीता स्वतःचा उद्योग सुरु करु
इच्छित,व्यक्तींनी प्रशिक्षणाचा लाभ ध्यावा प्रशिक्षणासाठी वयाची किमान पात्रता
18 ते 50 वर्ष वयोगटातील बेरोजगार व युवक-युवती फक्त 30 प्रशिक्षणार्थींना
प्रवेश देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क मिटकॉन जिल्हा कार्यालय, नासरे
सभागृहाच्या समोर, आर्वी नाक्याजवळ, इंदिरा नगर वर्धा किंवा जिल्हा प्रशिक्षण
समन्वयक 9552701150 यांना संपर्क करुण प्रशिखणासाठी नाव नोंदणी करावी.
000
No comments:
Post a Comment