वर्धा
दि.18 आधार नोंदणीमध्ये संपूर्ण
राज्यात वर्धा जिल्ह्याने उत्कृष्ट कार्य केले असून सुमारे 86 टक्के जनतेची आधार
नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. आधार कार्ड नोंदणी झाल्यानंतर पोष्टाव्दारे आधार
ओळखपत्रा घरपोच पाठविण्यात येते. परंतू ज्यांना अद्याप ओळखपत्र प्राप्त झाले नाही
त्यांना शासनाच्या वेबसाईवरुन आधार पत्राची प्रत उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची
माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज दिली.
आधार
नोंदणीसाठी विशिष्ठ ओळखपत्र प्राधिकरण तयार करण्यात आले असून स्वतंत्र पोर्टलही
सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरुन नोंदणी केलेल्या नागरिकांना आधार ओळखपत्राची
प्रत छापून घेता येईल. यासाठी caadhaar.uidai.gov.in वर लॉगईन
करुन आधार पत्राची प्रत छापता येईल. या विशिष्ठ ओळख
प्राधिकरणाकडून डिजिटल स्वाक्षरीही करण्यात आली
असल्यामुळे याचा उपयोग आधार ओळखपत्र म्हणूनही होणार आहे. नियमितपणे पोष्टाव्दारे आधार ओळखपत्र प्राप्त होईपर्यंत वेबसाईटवरुन
उपलब्ध झालेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
आधार
पत्र मिळविण्यासाठी इंटरनेट तसेच प्रिंटरची सुविधा असल्यास महाराष्ट्र शासनाच्या
युआयडीएआय च्या वेबसाईटवर उपलब्ध होईल. परंतू
ज्यांच्याकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही त्यांना केवळ दोन रुपये भरुन महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र तसेच संग्राम केंद्रावर आधार पत्राची प्रत
उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी एन नवीन सोना यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment