वर्धा दि.15- वर्धा जिल्ह्यामध्ये
2012-13 साठी रब्बी हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यामधील 92
महसूल मंडळे त्यासाठी अधिसूचित करण्यात
आलेली आहे. महसूल मंडळाची यादी तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.
या योजनेत सहभागी
होण्याची अंतीम मुदत पिकाची पेरणी झाल्यापासून एक महिना किंवा जास्तीत जास्त 31
डिसेंबर,2012 राहील. या योजनेत कर्जदार व
बिगर कर्जदार शेतकरी सहभागी होऊ शकतील.
योजनेच्या
मार्गदर्शक सूचना व प्रपत्र सर्व बँकामध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील
जास्तीत जास्त शेतक-यांनी घ्यावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
भाऊसाहेब ब-हाडे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment