Sunday 25 September 2011

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पंचायत समिती महत्वाची संस्था केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख


  महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. *             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.25 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते आर्वी येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन झाले.यावेळच्या छायाचित्रात पालकमंत्री  राजेंद्र मुळक आणि आर्वीच्या नगराध्यक्षा लता तळेकर दिसत आहेत.
 वर्धा,दि.25- ग्रामीण भागात जनतेसाठी पंचायत समिती ही खूप मोठी संस्था असते या भूमिकेतून सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांनी केले.
     आर्वी येथे बांधण्यात आलेल्या पंचायत समितीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजेंद्र मुळक तसेच खासदार दत्ता मेघे, आमदार जैनुदीन जव्हेरी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील राऊत आर्वीतील काँग्रेस नेते अमर काळे, नगराध्यक्ष लता तळेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
     मी. माझ्या राजकीय जीवनाची सुरवात ग्रामीण भागातूनच केली त्यामुळे ग्रामीण जनतेच्या समस्यांची मला पूर्ण जाण आहे असे देशमुख यावेळी म्हणाले.
     1 कोटी 30 लाख 12 हजार रुपये खर्चून ही नवी इमारत बांधण्यात आली आहे. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने तसेच सभापती महिला व बाल कल्याण जि.प. सौ.रजनीताई देशमुख, सभापती बांधकाम समिती जि.प. महानामा रामटेके, सभापती पं.स.आर्वी शिवलाल जाधव, गटविकास अधिकारी पं.सं आर्वी संजय दा.वानखेडे, उपसभापती पं.स.अर्वी सौ.मिना देशमुख, जि.प.सदस्य सौ.तृप्ती पावडे, व चंद्रकांत कांडलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
     यापूर्वी विलासराव देशमुख यांच्या हस्ते आदीवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाच्या इमारतीचे उद्घाटन झाले ही इमारत 1 कोटी 11 लाख आणि 1 कोटी 19 लाख अशा दोन टप्प्यात बांधण्यात आलेली आहे.
     सोबतच शहरातील मटण मार्केटचे भूमीपूजन, पाणीपुरवठा वितरण योजना, रस्ते बांधकाम प्रारंभ आदी विकासकामांचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.
                

No comments:

Post a Comment