Monday 26 September 2011

आधार क्रमांक: वर्धा जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर एकुण लोकसंख्याच्या 53 टक्के नोंदणी पूर्ण


महाराष्ट्र शासन
वृत्त विशेष.क्र.1 *      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.26 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------

वर्धा,दि.26- राज्यात एकूण लोकसंख्येपैकी 2 कोटी 32 लाख 693 जणांची नोंदणी 18 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाली. एकूण लोकसंख्येच्या 21 टक्के नोंदणीचे काम यामुळे पूर्ण झाले. या तुलनेत वर्धा जिल्ह्यात अतिशय वेगाने काम सुरु आहे.
     वर्धा जिल्ह्यात एकूण लोकसंख्येपैकी 6 लाख 46 हजार 118 जणांची नोंदणी पूर्ण झाली. याची टक्केवारी 52 टक्के इतकी येते. वर्धेखालोखाल गडचिरोली आणि जालना जिल्ह्याचा क्रमांक येतो. या जिल्ह्यांमध्ये 32 टक्क्यापर्यंत नोंदणी पूर्ण झाली आहे. तिस-या क्रमांकावर गोंदिया जिल्हा असून येथे 30 टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे.
     लगतच्या नागपूर जिल्ह्यात 16 टक्के नोंदणी पूर्ण झाली तर नागपूर मानपा क्षेत्रात 49 टक्के नोदणीचे काम पूर्ण झालेले आहे. यवतमाळ जिल्ह्यात नोंदणीचे हेच प्रमाण 16 टक्के इतके आहे.
     वर्धा जिल्ह्यात नोंदणीचे काम करणा-या टेरासॉफ्ट या कंपनीचे अमित बाजिये यांनी सांगितले की जिल्ह्यात नोंदणीसाठी नगारिकांनी स्वत:पुढाकार घेतल्याने इतक्या वेगवान पध्दतीने नोंदणी करणे शक्य होत आहे. याही पुढील काळात नागरिकांचे असेच सहकार्य लाभेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment