Wednesday 20 July 2011

वाठोडा गावाला सतर्कतेचा इशारा

प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.20 जुलै 2011  
      
          वर्धा, दि. 20- निम्न वर्धा धरणाच्या पाण्याची पातळी आज सकाळी 8 वाजता 277.90 मिटर असून ती वाढण्याची शक्यता आहे. या  धरणातून  नदीच्या पात्रात पाणी सोडल्यास आर्वी तालुक्यातील मौजा वाठोडा या गावाला पुराचा धोका संभवतो त्यामुळे या गावाला सर्तकतेचा इशारा दिला असल्याचे वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा यांनी कळविले आहे.
          दिनांक 21 जुलै 2011 रोजी सकाळी 8 वाजता पासून धरणातून नदीच्या पात्रात पाणी सोउण्यात येणार आहे. नदी काठावरील आजूबाजूच्या लोकांनी सुध्दा सावधगिरी बाळगावी, असे वर्धा पाटबंधारे विभाग, वर्धा कळवितात.
                                          00000

No comments:

Post a Comment