2 हजार 875 पिण्याच्या पाण्याचे
स्त्रोतांचे सर्वेक्षण पूर्ण – संजय मीणा
·
434 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड
·
पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना
·
लाल कार्ड असणारी एकही ग्रामपंचायत नाही
वर्धा, दिनांक 07 – नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतनिहाय सर्वेक्षण वर्षातून दोनदा करण्यात येते. पावसाळ्यानंतरच्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील 514 ग्रामपंचायतींना 2 हजार 875 स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना नियमित शुद्धीकरण करून तसेच ब्लिचिंग पावडर असलेलेच पाणी पुरवण्यालाच प्राधान्य देण्यात आल्यामुळे पाणी पिण्या अयोग्य असलेला एकही स्त्रोत नसल्यामुळे कोणत्याही ग्रामपंचायतींना लाल कार्ड देण्यात आले नाही.
पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामीण भागात जलजन्य आजार उद्भवू नये यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे सर्वेक्षण करून पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्यात येते. या तपासणीनंतर ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड, पिवळे कार्ड तसेच ज्या स्त्रोतांचे पाणी पिण्या अयोग्य आहे,
अशा ग्रामपंचायतीमधील स्त्रोतांना लाल कार्ड देण्यात येते. जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार 434 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले असून येथील पाणी पिण्यायोग्य असल्याचे वैद्यकीय अधिका-यांमार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.
80 ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड देण्यात आले असून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे
उप अभियंत्यामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना कळविण्यात आले असून पिवळ्या कार्डाचे हिरव्या कार्डात रूपांतरीत करण्यासाठी संबंधित स्वत:च्या सभोवतालचा परिसर स्वच्छ असण्यासोबत प्लॅटफॉर्म फुटलेला असेल, अनियमित शुद्धीकरण किंवा ब्लिचिंग याकरीता 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला असून या सर्व ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पाणी शुद्धीकरणासाठी जलसुरक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले असल्याची मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.
*****
No comments:
Post a Comment