विविध योजनांचा शेतक-यांनी लाभ घेऊन विकास साधावा
-
ज्ञानेश्वर भारती
Ø ग्राम उदय ते भारत उदय अभियान
Ø तळेगाव, लोणसावळीमध्ये किसान ग्रामसभांचे आयोजन
वर्धा, दिनांक 14 - शासनाच्या विविध कल्याणकारी व लोकोपयोगी अशा योजना आहेत. त्यांचा सर्व शेतक-यांनी लाभ घ्यावा व विकास साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती यांनी केले.
सामाजिक समररसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावांचा विकास तसेच शेतक-यांच्या प्रगतीसाठी ग्रामोदयातून भारत उदय हे अभियान जिल्हयात राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत तळेगाव (टा), लोणसावळी येथे कृषी विभाग, जिल्हा परिषदेमार्फत किसान ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मिलिंद भेंडे, सरपंच अतुल तिमांडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी एस.एम.खळीकर, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. उल्हास नाडे, तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, कृषी अधिकारी श्री.मौजे, कृषी सहायक श्री.
मोघे, अंकुश लोहकरे, कृषी पर्यवेक्षक श्री.
कापसे, ग्रामसेवक किनीकर, श्री. राऊत उपस्थित होते.
श्री.
खळीकर, श्री. नाडे यांनी अवेळी पडणारा पाऊस व नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या शेतपिकांचे नुकसान तसेच कृषीमालाच्या बाजारपेठेतील किमतीत चढ-उतार यापासून शेतक-यांना संरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतक-यांनी सहभागी होवून येत्या खरीप हंगामापासून पीक विमा योजनेचे संरक्षण कवच घ्यावे, असे आवाहनही उपस्थित शेतक-यांना त्यांनी केले.
जमिनीला आवश्यक असणारी घटकद्रव्ये माती परीक्षण करून घेतल्यास समजते. जमिनीला आवश्यक असणारी मुलद्रव्ये योग्य प्रमाणात दिल्यास जमीन कसदार होऊन उत्पन्न वाढीस मदत होते.
तसेच पिकांच्या योग्य नियोजनाचाही विचार करावा. सेंद्रिय शेती,
बायोगॅस, फळबाग योजना, विशेष घटक योजना, पीक नियोजन, कीड व्यवस्थापन आदींसह शेतीपूरक योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तळेगाव, लोणसावळीतील सभेसाठी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment