हदय, कर्करोग रुग्णांचे विशेष मोफत तपासणी शिबिर
·
150 रुग्णांना
मिळाला लाभ
नागपूर, दिनांक 20 – -हदयरोग, कर्करोग किडणी तसेच महिलामधील कर्करुग्णांच्या
आजाराची तपासणी व उपचारासाठी आयोजित विशेष तपासणी शिबिरात 170 रुग्णांची तपासणी
करुन उपचार करण्यात आले.
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त मानेवाडा रोडवरील जवाहर नगर
येथे कांबळे हॉस्पिटल व नर्सिंग होमतर्फे विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
आले होते. सुप्रसिध्द -हदयरोग शल्य चिकित्सक डॉ. ए. टी. कांबळे, पुण्याच्या
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शस्त्रक्रिया विभागाच्या डॉ. मयुरी कांबळे व स्त्रीरोग
तज्ञ डॉ. पुष्पा कांबळे यांनी रुग्णांची तपासणी करुन मोफत औषधोपचार केला. पूर्व
नागपुरातील मागास भागात राहणा-या रुग्णांना
-हदयरोगासारख्या उपचारापासून वंचित राहावे लागते अशा रुग्णांसाठी
मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया
व इतर उपचाराची आवश्यकता आहे. अशा 75 रुग्णांचा संपूर्ण उपचार करण्यात येणार
असल्याची माहिती डॉ. ए.टी. कांबळे यांनी दिली.
मोफत
औषधोपचार व तपासणी शिबिराचे उद्घाटन नगरसेविका श्रीमती नयना झाडे व अशोक कारले
यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे
माजी प्राचार्य डॉ. नामदेव सास्ते होते.
महाविद्यालयामध्ये
स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. थॉइराईड,
वंध्यत्व, गर्भपेशीच्या आजाराची विशेष तपासणी यावेळी करण्यात आली. 30 महिला
रुग्णांवर उपचार करण्यात आले. पुरुषांमध्ये
-हदयरोग ,हरनिया, हायड्रोसिल, लिव्हर कॅन्सर आदी आजारांबाबत यावेळी मार्गदर्शन
करण्यात आले. 2007 पासून नियमित तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याने
जेष्ठ नागरिक महिलांनी तपासणी शिबिरात सहभाग घेतला.
0000
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन
वर्धा,
दिनांक 16 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी
जिल्हयांत पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार
पाणी टंचाई निवारणार्थ जिल्हाधिकारी कार्यालय , वर्धा येथे हेल्पलाईन क्रमांक (07152- 243446) वर पाणी टंचाई नियंत्रण कक्ष स्थापण करण्यात आलेला
आहे. ऑफिस वेळेनंतर व सुटीच्या दिवशी नियंत्रण कक्ष सुरु ठेवण्यात येत आहे.
पाणी टंचाई
बाबत तक्रार, अडचण असल्यास हेल्पलाईन
क्रमांकावर तक्रारदारांनी नाव, गाव व तक्रारीचे स्वरुप आदी माहितीसह
तक्रार सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment