Thursday 21 April 2016

गावांच्या विकासासह शेतक-यांची प्रगती साधा
-         विलास कांबळे
Ø  ग्रामोदयातून भारत उदय अभियानाचा शुभारंभ
Ø  ग्राम उदय अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन
            वर्धा, दिनांक 13सामाजिक सलोखा अभिसरण वृद्धींगत करण्यासाठी, पंचायत राज संस्थेचे बळकटीकरण तसेच शेतक-यांच्या विकासासोबतच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी ग्रामोदयातून भारत उदय अभियान महत्तवपूर्ण असे आहे. या अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन गावांच्या विकासासह शेतक-यांची प्रगती साधण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी केले.
            जिल्हा परिषदेच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्राम उदय से भारत उदय अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा, अति.मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, गजेंद्र सुरकार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
             जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास कांबळे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड गुणवत्ता शिक्षणाच्या बळावर जागतिक किर्ती मिळविली. गोरगरिबांना विकासाच्या प्रवाहात आणलेअस्पृश्यता दूर केली. जागतिक किर्तीवंत डॉ. बाबासाहेबांनी जात अस्पृश्यांमध्ये मोडणारी असणारी एकूणच समाजाला मिळणारी वागणूक पाहून त्यांनी अस्पृश्यता उद्धाराचे कार्य केले. सर्वच क्षेत्रात त्यांनी उत्तूंग कार्य केले. त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानानुसारच संपूर्ण भारत देश चालतो, हे त्यांचे वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या विचारांवर सर्वांनी चालून सामाजिक सलोखा अभिसरणासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
               जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी अभियानाचा उद्देश सांगून डॉ. बाबासाहेबांनी वंचितांना विकासाच्या प्रवाहात आणले. सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासांना समानाधिकार दिला. त्यांचे कार्य अविस्मरणीय असे आहे. त्यांच्या जयंती दिनापासून सुरूवात झालेल्या ग्राम उदय से भारत उदय या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हास्तरापासून ग्रामपातळीपर्यंत करण्यात आलेले आहे. अभियान यशस्वीतेसाठी सर्वांचाच उत्स्फूर्त सहभाग महत्त्वाचा असून यशस्वीतेसाठी सर्वांनी पुढे यावे, असेही त्यांनी आवाहन केले.
              सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र सुरकार यांनी सामाजिक सलोखा अभिसरण या विषयाची मांडणी केली. यामध्ये त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांच्या विचारातून समाजासाठी कार्य केले. ते केवळ दीनदलितांचे उद्धारकर्ते नव्हते तर त्यांनी समस्त भारतीयांचे कल्याण केले आहे. विद्वान अशा या महामानवाने जात धर्मावर कोरडे ओढून सामाजिक अभिसरणाची सुरूवात केली आहे.सामाजिक अभिसरणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे निती. भारतीय संविधान आपणाला नितीवान बनविते. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे नैतिकमुल्य जोपासून जात, धर्माच्या पलिकडे विचार करून कृतीतून विवेकाधिष्ठित समाजाची निर्मिती केल्यासच विकास होईल. जात, धर्माच्या बेड्या तोडून मी केवळ भारतीय आहे ही भावना बाळगली तरच सामाजिक अभिसरण होईल, असेही श्री. सुरकार म्हणाले.
मान्यवरांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर उपस्थितांनी सामाजिक सौहार्द सामाजिक समता राखण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. इलमे, सूत्रसंचालन सुरेश हजारे यांनी केले. आभार श्री. रामटेके यांनी मानले.
रॅलीने अभियानाला सुरूवात
ग्राम उदय से भारत उदय अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांच्याहस्ते अभियान रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. जिल्हा परिषद ते डॉ. बाबासाहेब पुतळ्यापर्यंत रॅली काढून जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर रॅलीचा समारोप झाला.
*****

ग्राम उदय ते भारत उदय अभियानांतर्गत
किसान, ग्रामसभांसह विविध कार्यक्रम
                  वर्धा, दिनांक 14 - सामाजिक समररसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावांचा विकास तसेच शेतक-यांच्या प्रगतीसाठी ग्रामोदयातून भारत उदय हे अभियान संपूर्ण जिल्हयात 24 एप्रिलपर्यंत राबविण्यात येत आहे. सामाजिक सलोखा कार्यक्रमांतर्गत 14 एप्रिल ते 16 एप्रिलपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात येऊन सामाजिक सलोख्याच्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

ग्राम किसान सभेचे आयोजन
ग्राम किसान सभा या उपक्रमांतर्गत शेतक-यांचा विकास करणे तसेच गरिबांचे जीवनमान उंचाविण्यासाठी दिनांक 17 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे ग्रामस्तरावर आयोजन करण्यात येणार आहे, या उपक्रमामध्ये कृषीक्षेत्रातील योजनांची माहिती देणे शेतक-यांशी चर्चा करणे. कृषी क्षेत्रातील योजनांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, फलोत्पादन, मृदा परीक्षण काळ, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पशुपालन, मत्स्यपालन आदी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत 2022 पर्यंत  शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यावर विचार होणार आहे.
ग्रामसभेची बैठक
           संपूर्ण ग्रामीण विकासासोबतच आमचा गाव आमचा विकास आणि गावाच्या नियोजन प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी दिनांक 21 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत ग्रामसभेच्या बैठकी घेण्यात येणार आहेत. या ग्रामसभांमध्ये संपूर्ण ग्रामीण विकासाशी संबंधित विषयावर चर्चा करूनच ग्रामविकासाचा आराखडा तयार होणार आहे.
          ग्रामसभेपूर्वी गावांमध्ये प्रभातफेरी सांस्कृतिक खेळ आणि स्वचछता कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात येणार असून ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण आवास योजना, सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेंशन योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओमुद्रा योजना, कौशल्य विकास योजना, तसेच स्वास्थ विमा योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
24 एप्रिल पंचायत राज दिन
             पंचायत राज संस्थानचे बळकटीकरण करण्यासाठी 73 वी घटनादुरूस्ती 24 एप्रिल रोजी अमलात आली आहे, त्या अनुषंगाने 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. दिनांक 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून ग्रामसभांचे आयेाजनासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ग्रामसभेस संबोधित करणार असून त्याचे थेट प्रक्षेपण या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलिल तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मीणा यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सामाजिक न्याय विभागामार्फत रॅली
             वर्धा, दिनांक 14 – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त       डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुतळ्यापर्यंत समाज कल्याण विभागामार्फत रॅली काढण्यात आली. रॅलीपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार रामदास तडस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर त्यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, अति. मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर आदींसह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करून झाला.
जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी
           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महसूल कर्मचारी संघटनेतर्फे लाडूचे वाटप
           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महसूल कर्मचारी संघटना, पटवारी संघाच्यावतीने लाडूचे वाटप करण्यात आले. प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांच्याहस्ते तथागत गौतम बौद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पटवारी संघाचे अध्यक्ष शैलेंद्र देशमुख, यशवंत लडके, बंडू खवास, सुनील ठाकरे, राजू देशमुख, मुरानी लवणकर, विजय झाडे, जीवन बुरांडे, अनिल खडतकर, किशोर पेंदाम, राजू झामरे, श्री. वनकर यांची उपस्थिती होती.

*****

No comments:

Post a Comment