Thursday 21 April 2016

आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या
पाल्यांकरीता श्री सिद्धीविनायक शिष्यवृत्ती
Ø जिल्हाधिका-यांकडे अर्ज करण्याचे आवाहन
            वर्धा, दिनांक 07 – नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होऊन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे, अशा सर्व शेतक-यांचे पाल्य शिक्षणापासून वंचित राहू नयेतसेच शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी श्री सिद्धीविनायक गणपती मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे श्री सिद्धीविनायक शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.
              नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशा सर्व शेतक-यांच्या पाल्यांसाठी ही योजना असून शिक्षण घेत असलेल्या शाखेच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम श्री सिद्धी विनायक गणपती मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे पाल्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे.
             शिष्यवृत्ती योजना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या पाल्यांचे नाव, शैक्षणिक तपशील, शैक्षणिक शुल्क, पाल्यांचे बँक खाते क्रमांक आदी माहिती श्री सिद्धीविनायक न्यासाकडे पाठविणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या पाल्यांची माहिती संबंधित तहसीलदाराकडे द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले आहे.

                                                     *****

No comments:

Post a Comment