महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दिनांक 23/9/2011
----------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 23- पिपरी (मेघे) व 10 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. वर्धा, जि. वर्धा योजनेअंतर्गत असलेल्या सर्व नळ जोडणी धारक ग्राहकांनी पाण्याचे देयके प्रलंबीत असल्यास तातडीने भरण्याची कार्यवाही करावी. प्राधिकरणाच्या सुचनेनुसार चालू देयक मुदतीत न भरल्यास नळ जोडणी ताबडतोब खंडीत करण्यात येईल.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातर्फे वसुली पथक स्थापन करण्यात आलेले असून, प्रत्येक ग्राहकांच्या घरोघरी भेट देणार आहेत व ज्या ग्राहकांचे पाण्याचे देयक थकीत असल्याचे देयकावरुन निदर्शनास आल्यास त्यांची नळ जोडणी पुर्व सुचना न देता खंडीत करण्यात येईल. त्यामुळे पाण्याचे देयक वेळेवर भरुन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सहकार्य करावे. तसेच ग्राहकांच्या सुलभतेसाठी दि. 28 सप्टेंबर 2011 पासुन जलशुध्दीकरण केन्द्र हनुमानगड टेकडी, पिपरी (मेघे) आर्वी रोड येथे देयके स्विकारण्यात येतील. असे कार्यकारी अभियंता ,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बांधकाम विभाग, वर्धा यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment