Tuesday 20 September 2011

जिवन संजीवणी योजनेस मुदतवाढ


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.20 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------                   
      वर्धा,दि.20- शासनाने सन 2009 मध्ये ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांच्या थकित विज देयकासाठी लागु केलेल्या जिवन संजीवणी योजनेस मिळालेल्या प्रतिसादामुळे दि. 31 मार्च 2012 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.
     या योजनेचा वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजना असलेल्या ग्रामपंचायतींनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी व संबंधीत ग्राम प्रचायतींनी त्यांच्या पंचायत समितीकडे चौकशी करावी व योजनेचा लाभ घ्यावा. असे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय जयस्वाल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  शेखर चन्ने यांनी आवाहन केले आहे.
                            0000000

No comments:

Post a Comment