वर्धा, दि.27- केंद्र व राज्य पुरस्कृत योजना अद्यापही सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचलेल्या नाहीत त्यामुळे लाभार्भी संबधित योजनेच्या लाभापासून वंचित राहत असतात. यासाठी ग्रामीण क्षेत्रामध्ये जनजागरण करुन येाजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सर्वसामान्य जनतेला योजनाची अद्यावत माहिती अवगत करावी असे आवाहन आमदार ना.गो.गाणार यांनी केले.
येथील विश्राम भवनामध्ये नुकतीच (दि.25ऑगस्ट) जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आयेाजित जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा सभा संपन्न झाली त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरुन बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, आमदार अशेाक शिंदे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर चन्ने, प्रकल्प अधिकारी बि.एम.मोहन, सभापती धर्मशिल जगताप, सभापती छायाताई लांडे, सभापती अर्चनाताई तिमांडे, सभापती दिनेश धांदे, सभापती नंदाताई साबळे, अशासकीय सदस्यामध्ये विजय जावंधिया व विलास कांबळे आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
सामाजिक दायीत्वाचे भान ठेवून अधिका-यांनी सर्वसामान्यांच्या समस्याची सोडवणूक करण्याचे आवाहन करुन आमदार गाणार म्हणाले की, अधिका-यांनी नागरीकांशी सौजण्यपूर्व वागणूक ठेवून योग्य मार्गदर्शन केल्यास लाभार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.
याप्रसंगी प्रकल्प अधिकारी मोहन यांनी केंद्रशासित पुरस्कृत योजनांवर 24 मार्च 2012 पर्यंतच्या खर्चाचा आढावा सादर करताना सांगितले की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवर 99.47 टक्के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्के , सुवर्णजयंती स्वरोजगार योजनेवर 75.33 टक्के, इंदिरा आवास योजनेवर 88.34 टक्के, पंतप्रधान ग्रामीण सुवर्णजयंती योजनेवर 88.82 टक्के खर्च करण्यात आला असल्याचे सांगितले. गेल्या आर्थिक वर्षामध्ये स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजने अंतर्गत बँकेकडे कर्ज मंजूरीसाठी 271 प्रकरणे पाठविण्यात आली त्यापैकी 237 प्रकरणांना कज्र वितरण करण्यात आले. इंदिरा अवास योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 हजार 371 घरकुले मंजूर करण्यता आली त्यापैकी 1 हजार 763 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 608 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमा अंतर्गत सामाजिक वनीकरण विभागाकउून आष्टी येथील 8 कामावर 1 कोटी 80 लक्ष 58 हजार रुपये खर्च झालेला असून हरयाली कार्यक्रम अंतर्गत कारंजा, आर्वी व आष्टीचे पाणलोटाचे कामे प्रगतीपथावर असून त्यावर 6 कोटी 64 लक्ष 24 हजार रुपयापैकी 6 कोटी 17 लक्ष 50 हजार रुपये खर्च झालेले आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा येाजने अंतर्गत जिल्ह्यात 44 प्रस्तावांना मंजूरी दिली असून 43 कामे पूर्ण झालेली आहे. ग्रामीण स्वचछता कार्यक्रमा अंतर्गत फेब्रुवारी 2012 अखेर पर्यंत जिल्ह्यात दारिद्र रेषेवरील 56 हजार 557 लाभार्थ्यांना व दारिद्र रेषेखालील 55 हजार 280 लाभार्थ्यांना सौचालये बांधून देण्यात आली असून शाळेतील 1298 व आंगणवाउीचे 855 सोचालये बांधकाम करुन देण्यात आले आहे. त्यावर 14 कोटी 46 लक्ष 50 हजार रुपये खर्च झाला आहे.
यावेळी राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, पंतप्रधान शेतकरी पॅकेज, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान, शेतकरी कुटूंबातील मुलींच्या सामुहिक विविाह शुभमंगलम येाजना, राजीव गांधी ग्रामीण विद्यूतीकरण योजना आदी योजनांची माहिती प्रकल्प अधिकारी यांनी दिली.
या बैठकीचे आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. पी.व्ही. भालेराव यांनी मानले.
0000000
No comments:
Post a Comment