वर्धा,दि.27- सामाजिक ऐक्य पंधरवडा साजरा करण्याचे निमित्ताने दिनांक 29 ऑगस्ट 2012 रेाजी सदभावना शर्यत जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथुन सकाळी 8 वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेचे घोषवाक्य भारत-निरोगी आणि समर्थ हे आहे. तसेच राष्ट्रीय क्रीडा दिन हॉकीचे जादुगार (मेजर ध्यानचंद) यांचा जन्मदिवस सकाळी 9 वाजता साजरा करण्यात येणार आहे.
सर्व शाळा, महाविद्यालये, तसेच खेळाडू, क्रिडा प्रेमी, सर्व क्रिडा पुरस्कार विजेते, नेहरु युवा केन्द्र, भारत स्काऊट आणि गाईड्स, युथ होस्टेल असो. ऑफ इंडिया, राष्ट्रीय सेवा योजना व युवक बिरादरी यांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रिडा अधिकारी वर्धा यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment