वर्धा,दि.31- वर्धेचे उपविभागीय दंडाधिकारी हरिष धार्मिक यांनी एका आदेशान्वये तीन गुन्हेगारांना 2 वर्षाच्या कालावधीसाठी वर्धा जिल्हा व लगतचे जिल्हे यवतमाळ व अमरावती येथून तडीपार करण्यात आले आहे.
दिनांक 27 ऑगस्ट 2012 पासून करण्यात आलेल्या तडीपार गुन्हेगारांच्या नावामध्ये सागरसिंग केसरसिंग बावरी रा. ठाकूर मोहल्ला पुलगाव ता. देवळी,आशिष राजपाल गजबे रा. सुभाषनगर, पुलगांव ता. देवळी, रामेश्वर विठ्ठलराव हर्षे रा.बरांडा,पुलगाव ता.देवळी असे असून या गुन्हेगारांना नमुद केलेल्या जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधीत केले आहे.
0000
No comments:
Post a Comment