वर्धा,दि.31- डासामार्फत पसरणारे आजार हे किटकजन्य आजारामध्ये अंतर्भुत होतात. यामध्ये प्रामुख्याने हिवताप, डेंग्यूताप, मेंदुज्वर, चिकुनगुन्या या आजाराचा समावेश होत यावर्शी वातावरणातील बदल, अनियमितता व अपुरी पर्जन्यवृष्टी यामुळे किटकजन्य आजाराचा समावेश होतो. यावर्षी वातावरणातील बदल, अनियमितता व अपुरी पर्जन्यवृष्टी यामुळे किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत असल्याने जनतेनेही डासाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद माने यांनी केले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत जर हिवतापाचे प्रमाण बघितले तर जानेवारी ते जुलै 2011 या कालावधीत हिवतापाचे एकूण 247 रुग्ण आढळून आले होते. यावर्षी जानेवारी ते जुलै 2012 या कालावधीत एकूण 260 रुग्ण आढळून आलेले आहेत.
हिवतापाचा प्रादुर्भाव होण्याकरीता पोषक वातावरण, परिसर अस्वच्छता, स्थलांतर, शहरीकरण आदी परिसर अस्वच्छतेमुळे डासांची पैदास वाएते. शहरीकरणामुळे सगळीकडे नाल्या बांधलेल्या आहेत परंतू नालया वाहत्या राहील्या पाहिजे. ज्या ठिकाणी पाणी तुबलेले राहील, तिथे डास उत्पत्ती स्थाने तयार होतात. पाण्याच्या अनियमित पुरवठ्यामुळे लोक पाणी साठवुन ठेवतात. घरगुती पाण्याचे साठे झाकून न ठेवल्यामुळे डासांची वाढ होते.
यावर्षी नागव्दार (मध्यप्रदेश) येथे यात्रेला गेलेले यात्रेकरु परत आल्यानंतर आजारी पडण्याचे प्रमाण जास्त आहेत. यात्रेवरुन परत आलेला भाविक श्री. विठ्ठल महादेव यंत्रणेकडून संपुर्ण वर्धा जिल्ह्यातील गावामध्ये नागव्दारवरुन परतलेले यात्रेकरु यांचे सर्व्हेक्षण करुन 631 लोकांचे रक्तनमुने घेण्यात आले. त्यातील 11 रुग्ण हिवताप दुषित आढळले त्यांचेवर औषधोपचार करण्यात आला. यात्रेवरुन परतलेले यात्रेकरु काविळ सारख्या इतर आजारांनी आजारी होते. याबाबत सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात असली तरी जनतेनी काळजी घेणे आवश्यक आहे.
डासामार्फत पसरणा-या आजाराबाबत दक्षता
रुग्णाला थंडी वाजून ताप येणे, डोके दुखणे,वर्तणुकीत बदल होणे,झाटके येणे व तात्काळ बेशुध्द पडणे अशी लक्षणे आढळून आल्यास,सदरहू रुग्णाला त्वरीत जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुगणालयात त्वरीत दाखल करावे.
किटकजन्य आजाराचा प्रसार होण्याकरीता डास, सॅन्डफलॉय (माशी) किटक कारणीभुत आहे. हे किटक घरातील अंधा-या भागात, अडगळीच्या जागी भिंतीच्या भेगामध्ये गुरांच्या गोठ्यामध्ये आढळतात. तसेच किटकजन्य आजाराचे डास साचलेल्या पाण्यामध्ये, घरगुती वापराचे पाण्याचे भांडे, यात तयार होतात. त्यामुळे आपल्या घराच्या सभोवतालच्या परिसरात प्रामुख्याने गुरांच्या गोठ्यात स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. डासाचा प्रार्दूभाव टाळण्यासाठी संडासच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात. घराजवळील शेणाचे खड्डे , कच-याचे उकिरडे लोक वस्तीपासून दूर अंतरावर नाल्या गटा-यात पाणी साचू देवू नये, गटारे नाल्या वाहाते करावे, तसेच साचलेल्या पाण्यात क्रुड ऑईल टाकावे.
पिण्याच्या पाण्याच्या साठवणूक करताना घरगुती वापरावयाचे पाण्याचे भांडे यामध्ये डासांचे अळ्या होवू नये याकरीता भांडे कोरडे करुन घासून पुसून स्वच्छ करणे व नंतर पाणी भरावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
किटकजन्य आजारापासून बचावाकरीता झोपतांना मच्छरदाण्याचा वापर करावा.लहान मुलांना झोपतांना शरीराच्या जास्तीत जास्त भाग झाकला जाईल असे कपडे वापरावे व भिंतीपासून दूर झोपण्यासाठी व्यवस्था करावी.
00000
No comments:
Post a Comment