वर्धा, दि.29 - वर्धा जिल्ह्यातील बालकांवरील प्रलंबीत असलेल्या प्रकरणा संदर्भात बालन्यायालयाचे कामकाज दिनांक 1 सप्टेंबर पासून शुक्रवार ऐवजी गुरुवारी संपुर्ण दिवस होणार असल्याची माहिती बाल न्याय मंडळाचे अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के. अन्सारी यांनी दिली.
जिल्ह्यातील विधीसंघर्षीत बालकांवरील प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा निपटारा लवकर व्हावा यासाठी न्यायालयाचे कामकाजात बदल करण्यात आला आहे. श्री. संत गजानन महाराज सभागृह,सिंहगड प्लॉट जवळ केळकरवाडी येथील न्यायालयाचे कामकाज दर गुरुवारी संपूर्ण दिवस होणार आहे. यापूर्वी दर शुक्रवारी 11 ते 2 या वेळातच बालन्यायालयाचे कामकाज होत होते. सर्व पक्षकारांनी व वकीलांनी व विधी संघर्षित बालकांनी बालन्यायालयाची कामकाजात झालेल्या बदलाची नोंद घ्यावी. असे आज बाल न्याय मंडळातर्फे दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात स्पष्ट केले आहे.
000000
No comments:
Post a Comment