वर्धा, दि. 27 – जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ होत असून, पोथरा सिंचन प्रकल्प पूर्णपणे भरल्यामुळे 14 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे. लालनाला सिंचन प्रकल्पात 87.81 टक्के उपयुक्त जलसाठी असून या प्रकल्पाच्या दोन दरवाजामध्ये 25 सेंटीमीटरचा तसेच नांद जलाशयातून 15 सेंटीमीटरचा विसर्ग सुरु आहे.
जिल्ह्यातील निम्न वर्धा प्रकल्पामध्ये 57.24 टक्के जलसाठा असून या प्रकल्पातील तीन दरवाजे 10 सेंटीमीटरनी उघडण्यात आले आहे. जिल्ह्यातील इतर सिंचन प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेला जलसाठा पुढील प्रमाणे आहे.
धामप्रकल्प महाकाळी 14.94 द.घ्.मि. (23.90) टक्के, पोथरा प्रकल्प 34.72 द.घ.मि. (100 टक्के), बोर प्रकल्प 41.75 द.घ.मि. (32.79) टक्के , डोंगरगांव प्रकल्प 0.45 द.ल.घ.मि. (10.30) टक्के , पंचधारा प्रकल्प 1.95 द.घ.मि. (22.29 ) टक्के, मदन प्रकल्प 2.39 द.घ.मि. (22.67) टक्के , मदन उन्नई धरण 0.85 द.ल.घ.मि. (31.52) टक्के, लालनाला प्रकल्प 24.24 द.ल.घ.मिटर (87.81) टक्के , नांद प्रकल्प 17.10 द.ल.घ.मि. (83.87) टक्के , वडगाव प्रकल्प 112.92 द.ल.घ.मि. (83.3) टक्के , उर्ध्व वर्धा प्रकल्प 457.49 द.ल.घ.मि. (81.11) टक्के, वर्धा कार नदी प्रकल्प 12.23 द.ल.घ.मिटर (58.9) टक्के,
निम्न वर्धा प्रकल्प 59.12 द.ल.घ.मिटर (57.24) टक्के , बेंबळा प्रकल्प 112.9 द.ल.घ.मि. (37.1) टक्के, सुकळी लघु प्रकल्प 7.57 द.ल.घ.मिटर (7.78) टक्के .
0000000
No comments:
Post a Comment