वर्धा, दि. 29- वर्धा जिल्ह्यात सरासरी 516.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्हयात आजपर्यंत 48.6 टक्के पाऊस पडला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी जिल्ह्यात 19 टक्के पाऊस कमी पडला आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद समुद्रपूर तालुक्यात 708.7 मि.मी. नोंदविण्यात आली असून, जिल्हयात सर्वात कमी पावसाची नोंद सेलू तालुक्यात 272 मि.मी. पडला आहे. मागील वर्षी सेलू तालुक्यात सरासरी 760 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.
तालुकानिहाय पडलेल्या सरासरी पाऊस वर्धा 503.6 मि.मी., सेलू 272 मि.मी., देवळी 384.3 मि.मी., हिंगणघाट 663 मि.मी., समुद्रपूर 708.7 मि.मी., आर्वी 627 मि.मी., आष्टी 457 मि.मी. कारंजा 512 मि.मी., जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 4,128.5 मि.मी. म्हणजे सरासरी 516.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी एकूण 48.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षी 67.5 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्यात पडणा-या सरासरी पाऊस 1062.8 मि.मी. असून मागील वर्षीच्या तुलनेत 19 टक्के पाऊस कमी पडला आहे.
जिल्ह्यात 18 जून रोजी आर्वी तालुक्यात सर्वाधिक 145 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तसेच 31 जुलै रोजी कारंजा तालुक्यात 65.4 मि.मी. नोंद या पावसाळ्यात झाली आहे.
000000
No comments:
Post a Comment