वर्धा,दि.17- येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सदभावना दिन साजरा करण्यता आला. याप्रसंगी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी माल्यार्पन अर्पन करुन आदरांजली वाहली.
या सदभावना दिनानिमित्ताने अधिकारी व कर्मचा-यांना प्रतिज्ञा देण्यात आली.
यावेळी परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी पि. शिवशंकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी बि.एस.मेश्राम यांनी स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पन करुन आदरांजली वाहीली.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अग्निहोत्री व श्री.भुसारी त्यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment