जनतेनी लाभ घ्यावा
वर्धा, दि.14- जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधीकरणातर्फे रविवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावर महालोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून जनतेनी न्यायालयात प्रलंबीत असलेली व दखलपूर्ण प्रकरणे महालोकअदालतमध्ये ठेवून आपला वाद कायमचा संपुष्टात आणावा असे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस.शिवणकर यांनी केले आहे.
न्यायालयात प्रलंबीत असलेली प्रकरणे तडजोडीने त्वरीत निकाली काढण्याची सुवर्णसंधी महालोकअदालतच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जनतेनी महालोकअदालतीचा लाभ घेवून तहसिल स्तरावर तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात आयेाजित महालोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत असलेली व दखलपुर्व प्रकरणे ठेवावी व आपला वाद कायमचा संपुष्टात आणावा असे आवाहनही न्या. ए.एस.शिवणकर यांनी केल आहे.
000000
No comments:
Post a Comment