Thursday 16 August 2012

विकासाची दृष्‍टी असलेला नेता काळाच्‍या पडदयाआड राजेंद्र मुळक यांच्‍या शोकसंवेदना


       वर्धा,दि.15- केंद्रिय मंत्री व महाराष्‍ट्राचे  माजी मुख्‍यमंत्री  विलासराव देशमुख यांच्‍या निधनामुळे महाराष्‍ट्राची  अपरिमित हाणी झाली असून, विकासाची दृष्‍टी असलेला नेता काळाच्‍या पडद्याआड गेला असल्‍याच्‍या शोकसंवेदना राज्‍याचे वित्‍त व नियेाजन राज्‍यमंत्री तथा वर्धा जिल्‍हयाचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी व्‍यक्‍त केल्‍या.
      महाराष्‍ट्राचा  सर्वांगिण प्रगतीमध्‍ये तसेच विदर्भाच्‍या विकासामध्‍ये विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान  होते. नागपूर शहराच्‍या विकासासेाबत विदर्भात मोठया प्रमाणात उद्योग  यावेत यासाठी त्‍यांनी सातत्‍याने प्रयत्‍न केले. मिहान प्रकल्‍पामध्‍ये विलासराव देशमुख यांचे योगदान अत्‍यंत मोलाचे राहिले आहे. त्‍यांच्‍या निधनाने मार्गदर्शक हरवला असल्‍याची शोक संदेशात पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी म्‍हटले आहे. आहे.
                              0000000

No comments:

Post a Comment