वर्धा,दि. 23- राज्य निवडणूक आयोग यांचे आदेशान्वये वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांव, देवळी व सिंदी (रे) येथील संपूर्ण नगर परिषदेच्या मतदान क्षेत्रातील निवडणूकीसाठी मतदान दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी होणार आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी जिल्हाधिकारी जयश्री भोज यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मतदानाचा दिवस दिनांक 8 डिसेंबर 2011 रोजी सहा नगर परिषदाच्या मतदान क्षेत्रामध्ये स्थानिक सुटी जाहीर केली असल्याचे एका आदेशात नमूद आहे.
00000
No comments:
Post a Comment