वर्धा,दि.25- स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या दारिद्रय रेषेखालील आदर्श व सक्षम स्वयंसहायता गटांना प्रोत्साहीत करण्यासाठी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार योजना विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर सुरु आहे.
स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या प्रसार व यशस्वीतेमध्ये प्रसिध्दीचा मोलाचा वाटा असतो. जिल्हा स्तरावर स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेस व्यापक प्रमाणावर प्रसिध्दी देवून येाजनेच्या अंमलबजावणीत हातभार लावणा-या जिल्हयातील वृत्तपत्राचा प्रस्ताव त्यांनी प्रसिध्दी केलेल्या बातम्या, फोटो, चित्र, कार्य त्यांचे उपक्रम व लेखमाला यासह जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, वर्धा या कार्यालयास दि. 25 डिसेंबर 2011 पर्यंत सादर करावे. असे प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्धा कळवितात.
No comments:
Post a Comment