Saturday, 26 November 2011

भारताचे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा


     वर्धा,दि.26- 26 नोव्हेंबर हा दिवस भारताचे संविधान दिन मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयाजवळ सामाजीक न्‍याय विभागा अंतर्गत कार्यरत शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच मागासवर्गीय मुला व मुलींच्‍या वस्‍तीगृहाचे विद्यार्थी एकत्र येऊन भारताचे संविधानाचा जयघोष केला. तसेच अप्‍पर जिल्‍हाधिकारी एस.एम.भागवत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या पूर्णाकृती पुतळयाला माल्‍यर्पन करुन भावपूर्ण आदरांजली वाहीली.
     यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी भागवत यांनी भारताचे संविधानाचे उद्देशीकेचे वाचन करुन उपस्थीतांकडून ते वदवून घेण्‍यांत आले.
     यावेळी प्रा. निरंजन ब्राम्‍हणे, प्राचार्य मिलींद सवई, प्रा. डॉ.रफीक शेख, प्राचार्य सुनिल तोतडे, प्राचार्य डॉ. केशव वाळके, प्रा. ओमप्रकाश चांडक, प्रा. विशाखा काळे प्रा. विजयंता विटणकर, माधुरी झाडे, प्रा. अरविंद पाटील, गृहपाल अंबादे, शिक्षण व शिक्षकेत्‍तर कर्मचारी मोठया संख्‍यने उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्रकाश भेले यांनी केले यावेळी मोठया संख्‍येने विद्यार्थी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment