Monday 21 November 2011

खतांच्‍या बॅगवर नमूद केलेल्‍या किमतीतच शेतक-यांनी खते खरेदी करावी

वर्धा,दि.21- जिल्‍हयामध्‍ये रब्‍बी हंगाम 2011 सुरु झाला असून, काही प्रमाणात पेरणीला सुरुवात झाली आहे. त्‍या करीता शेतक-यांना आवश्‍यक असलेले बियाणे, रासायनिक खते कृषि सेवा केन्‍द्रात उपलब्‍ध आहे. प्रत्‍येक खत कंपन्‍याचे रासायनिक खताचे दर हे वेगवेगळे असल्‍यामुळे शेतक-यांनी रासायनिक खत खरेदी करताना खताच्‍या  बॅगवर नमुद केलेली वसूल पात्र रक्‍कमचे कृषि केन्‍द्र धारकाला अदा करावी. त्‍यापेक्षा जास्‍त रक्‍कम अदा करु नये.
     जर सदर कृषि केन्‍द्र धारकाने बॅगवर नमुद केलेल्‍या  वसूलपात्र रकमेपेक्षा जास्‍त रक्‍कम वसूल केल्‍यास तसेच रासायनिक खतासोबत आपल्‍याला आवश्‍यक नसलेले इतर साहीत्‍य कृषि  केन्‍द्र धारकाने शेतक-यांना लिकिंग करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास त्‍या कृषि केन्‍द्र धारकाची तक्रार तालुका कृषि अधिकारी, पंचायत समितीचे कृषि अधिकारी, जिलहा स्‍तरावर कृषि विकास अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा व जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी या कार्यालयात लेखी स्‍वरुपात तक्रार करावी.
     खरीप हंगामातही पूर्वी स्‍थापन केलेले भरारी पथके कार्यरत असून बियाणे, रासा.खते, औषधे याबाबत तक्रार असल्‍यास टोल फ्री क्रमांक 18002334000 वर संपक्र साधावा असे आवाहन आर. के. गायकवाड, कृषि विकास अधिकारी, जिल्‍हा परिषद वर्धा यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment