Friday 12 August 2011

स्वाभिमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीसाठी आवाहन


प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा             दि.12 ऑगस्ट 2011
   
     वर्धा,दि.12-वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या दारिद्र रेषेखालील भूमिहीन लाभार्थ्यांना आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे वतीने राबविण्यात येणा-या आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत सन 2011-12 मध्ये शेतजमीन खरेदी करुन वाटप करावयाची आहे.
     आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत ज्या शेतमालकांना जिरायती व बागायती जमीन शासकीय दराने भूमिहीन न होता विकण्यास इच्छूक असल्यास त्यांनी जमीनीचा 7/12 , नमुना आठ अ, नकाशा तसेच शासकीय बोजा व गहाण नसलयाचे आणि जमिनीवर कोणत्याही व्यक्तीचे वा संस्थेचे अतिक्रमण नसल्याचे तलाठी यांचे प्रमाणपत्रासह अर्ज कार्यालय, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गिरीपेठ, नागपूर येथे सादर करण्याबाबत आवाहन प्रकल्प अधिकारी ए.आ. वि.प्र. नागपूर यांनी केले आहे.
                           0000

No comments:

Post a Comment