Monday 16 January 2012

रस्‍ता सुरक्षा पंधरवाड्याचा समारोप थाटात संपन्‍न


   वर्धा, दि.16-1 जानेवारी पासून ते 15 जानेवारी 2012 या कालावधीत रस्‍ता सुरक्षा मोहीम पंधरवडा समापनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात येथील पोलीस स्‍टेशन  प्रांगणात संपन्‍न झाला.
     याप्रसंगी जिल्‍हा पोलीस अधिक्षक अविनाश कुमार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण, एस.टी.चे वाहतूक नियंत्रक पंचभाई व उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलताना पंचभाई म्‍हणाले की, रस्‍ता  सुरक्षा मोहीम ही समाजाच्‍या कल्‍याणकारी कार्यासाठी मोलाची ठरते. आपल्‍या देशामध्‍ये लोकसंख्‍या बरोबर वाहनाची संख्‍या वाढत आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण लक्षणीय ठरत आहे. अपघात होऊ नये यासाठी शालेय शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांना व समाजातील प्रत्‍येक घटकांना वाहतूकीचे नियम सांगितले. वाहतुकीच्‍या नियमांचे प्रत्‍येकांनी अंगिकार केल्‍यास अपघाताचे प्रमाण कमी होऊन कौटुंबिक वातावरण सुध्‍दा सुदृढ राहण्‍यास मदत होते. खाजगी प्रवासी वाहने हे सुरक्षिततेची हमी देत नाही तर एस.टी.महामंडळ प्रवाशांना संपूर्ण सुरक्षा देत असल्‍यामुळे प्रवाशांचा ओघ आता एस.टी. महामंडळाकडे वळला आहे असेही ते म्‍हणाले.
      प्रास्‍ताविक करताना चवहान म्‍हणाले की रस्‍ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक लोकाभिमुख अनेक उपक्रम घेण्‍यात आले. त्‍यामध्‍ये विद्यार्थ्‍यांची वत्‍कृत्‍व स्‍पर्धा, चित्रकला स्‍पर्धा, वाहन धारकांना हेल्‍मेट बंधनकारक करणे, पोष्‍टर काढणे आदींचा समावेश करण्‍यात आला. मानवीय चुकामुळे 70 टक्‍के अपघात होत असतात यासाठी पादचा-यांनी रहदारीचे नियमा सोबत रस्‍ता सुरक्षा विषयीचे नियम आत्‍मसात केले पाहीजे असे आवाहन याप्रसंगी त्‍यांनी केले.
     याप्रसंगी चित्रकला स्‍पर्धकांना पोलीस अधिक्षक अविनाशकुमार यांचे हस्‍ते स्‍मृती चिन्‍हांचे वितरण करण्‍यात आले.
     या कार्यक्रमाचे आभार शशिकांत भंडारे यांनी मानले. याप्रसंगी मोठ्या संख्‍येने प्रतिष्‍ठीत नागरीक, विद्यार्थी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
                               00000000

No comments:

Post a Comment