वर्धा, दि.16- ग्रंथोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम मोठ्या थाटात येथील न्यु इंग्लीश हायस्कुलच्या प्रांगणात (दि.14 रोजी) नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघ वर्धा जिल्ह्याचे अध्यक्ष संजय इंगळे तिगांवकर, प्रा. हाशम शेख, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर व ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.
तीन दिवशीय ग्रंथोत्सवाला मोठ्या प्रमाणावर वर्धेकरांनी प्रतिसाद दिला असल्याचे सांगून संजय इंगळे तिगावकर म्हणाले की, बाल मनावर वाचन साहित्य रुजविणे ही काळाची गरजेचे आहे. साहित्य ते कोणत्याही स्वरुपाचे असो त्यापासून समाजाने दूर राहू नये. साहित्यामुळे प्रत्येकाच्या ज्ञानामोलाची भर पडते, साहित्यातूनच चांगला माणूस घडत असतो असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना जिल्हा माहिती अधिकारी दैठणकर म्हणाले की ग्रंथोत्सवामुळे प्रत्येकांना ग्रंथ प्रदर्शनीला भेट देता आले. तसेच नवनविन साहित्यीकांचे ग्रंथ तसेच दूर्मिळ पुस्तकांची खरेदी करता आली. वाचन संस्कृती टिकावी हा गंथोत्सवामागील हेतू होता. या निमित्ताने झालेले कवि संमेलन, कथाकथन, बाल साहित्य संमेलन निश्चित ज्ञानात भर पाडणारी होती असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे यांनी तर आभार प्रदर्शन मनिष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment