Thursday 19 January 2012

हक्क मतदानाचा अन् कर्तव्य नोंदणीचे.. !

नविन मतदार नोंदणीसाठी जनजागृती व्हावी या करिता निवडणूक आयोगातर्फे 25 जानेवारी रोजी मतदार दिवस निश्चित करण्यात आला आहे त्याबाबतचा हा खास लेख
                                                  -प्रशांत दैठणकर

     भारतीय संविधानाने भारतात जन्मलेल्या आणि वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला मतदानाचा मुलभूत अधिकारी दिला आहे. 120 कोटी लोकसंख्येचा आपला देश जगातली सर्वात मोठी लोकशाही चालविणारा देश आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं लोकांच राज्य अशी लोकशाहीची संकल्पना आहे. त्यात सर्वाधिक महत्वाचा ठरतो तो मतदार. या मतदारांनीच आपला देश कोणी चालवायचा याचा निर्णय घ्यायचा असतो आणि लोकप्रतिनिधी निवड ही मतदार म्हणून तुम्ही-आम्ही करायची असते.
     भारतीय संविधानानुसार जो मूळ रचना आहे त्यानुसार थेट लोकांमधून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी संसदेत जातात. संसदेत लोकप्रतिनिधींची दोन सभागृहे आहे. यात लोकांनी मतदानाने निवडून द्यायचे सभागृह हे लोकसभा असून राज्यांमधील लोकांतर्फे निवडलेल्या प्रतिनिधींनी निवडलेले सदस्य राज्यसभेत बसतात ही संसद हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. लोकांच्या समस्या इथं मांडल्या जातात व यात कायदे करणे तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करणे आदी कामकाज होते.
     यापैकी लोकसभेत 547 प्रतिनिधी असतात या संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य ज्या राजकीय पक्षाचे असतात त्या पक्षाने आपला नेता पंतप्रधान म्हणून निवडायचा असतो. हा पंतप्रधान मग मंत्रीमंडळाची निवड करतो. या व्यवस्थेला आपण सत्ताधारी म्हणतो.
     संसदेतर्फे करण्यात आलेल्या कायद्यांवर आधारित न्याय निवाडा करण्याचे काम न्याय पालिका करते. सर्वात ज्येष्ठ असे सर्वोच्च न्यायालया त्याच्या अधिपत्याखाली उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये अशी व्यवस्था असणारी न्यायपालिका हा लोकशाहीचा दुसरा स्तंभ होय.
     देशाचे शत्रू देशांपासून रक्षण तसेच अंतर्गत सुरक्षा आणि प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अशी जबाबदारी संरक्षण दलांची असते ही संरक्षण दले हा लोकशाहीचा तिसरा स्तंभ होय. समुद्री सैन्य अर्थात नौदल, हवाई दल आणि जमीनीवर लष्कर अशी तीन अंगे या संरक्षण दलांमध्ये आहेत.
     या सर्व तीन स्तंभाची जबाबदारी राष्ट्रप्रमुख या नात्याने राष्ट्रपतीवंर असते. लोकप्रतिनिधी निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती भारत निवडणूक आयोगातर्फे होते ही स्वायत्त यंत्रणा असून याच्या कामावर सरकारचे नियंत्रण अथवा हस्तक्षेप होत नाही.
     निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली की भारतातील सर्व भारतीय शासकीय कर्मचारी निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात. ज्या पध्दतीने राज्यात आमदार निवडले जातात जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यामध्येही निवडणूका होतात. नगरपालिका, महानगरपालिका यांचेही प्रतिनिधी निवडून द्यायचे असतात.
     लोकशाहीत सर्वच टप्प्यांवर या सर्वांमुळेच मतदार महत्वाचा आहे हे जाणून वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा सर्वांनी मतदानाच्या हक्कासाठी मतदार म्हणून नोंदणीचे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे.
- प्रशांत दैठणकर       

No comments:

Post a Comment