वर्धा,दि.16- न्यु इंग्लीश शाळेच्या प्रांगणात (दि. 14 रोजी) नुकताच ग्रंथोत्सव अंतर्गत बाल साहित्याच्या कला अविष्कारांनी चालणा मिळाली. याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी बाल साहित्य कार्यक्रमात सहभागी होऊन एक आगळा वेगळा ठसा उमटविला. राजकारण, समाजकारण, अर्थ व सांस्कृतिक कलेला जोड देवून अनेक विद्यार्थ्यांनी आपण उद्याचे उदयन्मुख साहित्यीक आहोत याचा परिचय मोठ्या धैर्याने करुन त्यांनी कविता, नाटीका, कथा व गझलचे श्रोत्यांपुढे सादरीकरण केले.
यावेळी सुशिलचंद्र आलेख, प्रभाकर पाटील, संजय इंगळे तिगांवकर व शेख हाशम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, ग्रंथपाल सुरज मडावी मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी सुशील हिंम्मतसिंगका माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शोभवी उदय, इंद्रायणी गावंडे, अपूर्वा औझोकर, आदिती फाये, संघमित्रा पवार, प्रेरणा ढाले, वृषाली अवचट, मोनिका खिल्लारे, चैताली ठाकरे ,आकांक्षा राखुंउे, चेतन महंतारे, किशोर तमगिरे, व्यंकटेश टेकाडे, शंतनू घुमडे व मुकूल नगराळे . राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यालयातील विद्यार्थी सुयोग अवचित, हर्षल कावळे, हर्षल बुरंगी, नेहाल चामटकर, सम्यक लोहकरे, मयुर सोनटक्के व आकाश उजवणे. साने गुरुजी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पूर्वा गव्हाने व अबोली निर्मल, वनश्री कात्रोजवार व जानवी साबळे . स्व. जिजामाता सबाने पूर्व माध्यमिक विद्यालयाचे अश्वीती नाखले, प्रणाली हलगे व प्रतिक कुरवटकर यांचा समावेश होता.
युवा साहित्य संमेलनामध्ये मंगेश शेंडे, रेखा जुगनाके, संदिप चिचाटे, चेतन परळीकर, संजय भगत यांनी सामाजिक आशयावर कथा व कविता सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे संचलन पंकज वंजारे व आभार प्रदर्शन मनाष जगताप यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment