वर्धा,दि.5–तहसिल कार्यालय, अन्न नागरी पुरवठा विभाग व ग्राहक चळवळीतील संधटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (दिनांक 26 डिसेंबर) राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर जिलहा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष आर.बी.सोमानी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे सुषमा जोशी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद विदर्भ विभागाचे सचिव अजय भोयर व अधिष्ठाता अशोक पावडे आदी मान्यवर उपसिथत होते.
ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. उत्पादन विक्रेत्या सोबत ग्राहकांनी खरेदी केलेली वस्तू योग्य व वाजवी दरांमध्ये आकारली असल्याचे विक्रेत्याकडून ग्राहकांनी पावती घेणे आवश्यक आहे. यावेळी ग्राहकांचे हक्क याविषयी मार्गदर्शन उपस्थित पाहूण्यांनी केले.
यावेळी वजनमापे व अन्न व औषधी विभागातर्फे प्रदर्शनी लावण्यात आली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment