वर्धा,दि.7–वर्धा जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव सन 2011-2012 दिनांक 9 जानेवारी 2012 रोजी ठेवण्यात आलेला होता. दि. 3 जानेवारी 2012 रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू झाल्यामुळे निवडणूक आयोगाकडे रेतीघाट लिलावाबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. आयोगाकडून खुलासा प्राप्त होईपर्यंत सदर रेतीघाट लिलावास याव्दारे स्थगिती देण्यात येत आहे. सर्व रेतीघाट लिलाव इच्छुकांनी याबाबतची नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी, वर्धा यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment