Thursday 5 January 2012

युवकांनो व्‍हाय धीस कोलवरी .....!


     व्‍यक्‍ती संपन्‍न तर राष्‍ट्र संपन्‍न असं सूत्र आहे. आजची युवक पिढी एका बाजूला कोलवरी डी म्‍हणत फेसबूक वापरत आहे. दुस-या बाजूला नोकरीची मानसिकता सर्वांमध्‍ये दिसते. संपत्‍तीची संकल्‍पना (Concept of wealth ) युवकांनी समजून घेऊन त्‍यानुरुप वाटचाल केली तरच देश संपन्‍न बनेल. राष्‍ट्र महासत्‍ता बनेल असं चित्र आहे. 12 जानेवारीच्‍या युवक दिनानिमित्‍त काही विचार.
                                     - प्रशांत दैठणकर                                                        
      येणा-या  काळात आपला देश आर्थिक महासत्‍ता बनणार आहे. या वाक्‍याला आधार अर्थात आजची युवा पिढी. युवक ही शक्‍ती  आहे. आणि आजमितीस आपला देश सर्वाधिक युवकांचा देश आहे. युवक राष्‍ट्र घडवतात. या पिएीची आजची स्‍वतःची अशी कहाणी आहे. एका बाजूला तंत्रज्ञानाच्‍या प्रगतीतून अनेक बाबी साध्‍य करताना जग बोलवतय तर दुस-या बाजूला प्रगतीचे मार्गच सापडत नाही अशा मार्गावर आजचा युवक दिसतो.
     फेसबूकवर अनेक जण पडीक आहेत. इंटरनेटचा नेमका वापर अभ्‍यासाऐवजी मनोरंजनासाठी होताना दिसतोय. एमबीएचे कोर्स शोधण्‍याऐवजी `कोलवरी डी` मध्‍ये अधिक जणांचे लक्ष आहे की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आपणास दिसते.
     तारुण्‍य, चैतन्‍याचा एक झरा, मंतरलेले दिवस एक कैफ, धुंदी, मस्‍ती आणि यात बुडवून घेण्‍याचा काळ हे चैतन्‍य सकारात्‍मक असलं पाहिजे. 15 ऑगस्‍टला स्‍वातंत्र्य दिन साजरा करताना ही पिढी कुठे आहे याचा शोध घ्‍यावाच लागतो. न्‍यू इअर आणि व्‍हॅलेंटाईन डे जल्‍लोषात साजरा करणारे 15 ऑगस्‍टला पिकनिक करताना दिसतात हे दुर्दैव आहे.
     राष्‍ट्र घडवायचं तर राष्‍ट्र आणि त्‍याचा इतिहास जाणून घ्‍यायला पाहिजे. फेसबूकवर टिका करणे किंवा फोटो पोस्‍ट करणे या माध्‍यमातून देशभक्‍ती दाखवणे ही राष्‍ट्रभक्‍ती होत नाही. आपण राष्‍ट्राला महाशक्‍ती किंवा महासत्‍ता बनवायचं स्‍वप्‍न बघतोय तर आपली कृती देखील त्‍याच दिशेने जाणारी हवी.
     राष्‍ट्राला पुढे नेताना राष्‍ट्रीय तसेच आंतरराष्‍ट्रीय घटना घडामोडींची माहिती घेणं त्‍याचं विश्‍लेषण करणे आपल्‍याला शिकावं लागेल. अर्थकारण आणि व्‍यवहारज्ञान आपणास असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा असलं पाहिजे. अमूक एकच पद मिळाल्‍याने देशाची सेवा होते असं नाही तर कोणतेही काम देशाच्‍या प्रगतीला हातभार लावणारे आहे अशी सकारात्‍मक मानसिकता आपण बाळगायला हवी.

     अमेरिका हे संपन्‍न राष्‍ट्र आहे कारण संपत्‍ती कशी कमवावी हे तेथील प्रत्‍येक नागरिक जाणतो. संपत्‍ती अर्थात वेल्‍थ कशी वाढता येईल याचा विचारच आपणाकडे नाही 90 टक्‍के युवक आजही शिक्षण झाल्‍यावर  नोकरीचा विचार करताना दिसतात नोकरी अर्थात पोटपाणी (ब्रेडअँन्‍ड बटर) या नोकरीतून आपण संपत्‍ती जमा करु शकत नाही.

     नोकरीमध्‍ये महागाई आणि पगार यांचा मेळ बसविण्‍यात निवृत्‍ती  कधी येते तेच कळत नाही अशी स्थिती आहे. जागतिकीकरणानंतर मागणी आणि पुरवठ्याच्‍या गणितात पेट्रोल, वीज, अन्‍नधान्‍य आदींच्‍या किंमत सतत वाएणार आहेत. यापुढेही ही वाढ सुरुच राहील. या चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपणास संपन्‍न व्‍हावं लागेल. संपत्‍तीची संकल्‍पना जाणून सर्वांनी त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करायला लागेल. अशाच प्रकारे व्‍यक्‍ती संपन्‍न झाल्‍या तरच राष्‍ट्र संपन्‍न होईल याची जाण आणि भान सर्वांनी ठेवण्‍याची गरज आहे.

     शेतीप्रधान देशात आपण शेती व त्‍यावर आधारित उद्योगांवर भर देणे, पारंपरिक शेती सोडून बाजारपेठेत काय बदल झालेत याचा विचार करुन शेती करणे काळाची गरज झाली आहे. आपण आपल्‍या देशाचे चित्र बघितल्‍यास पंजाबमध्‍्ये  शेती अतिशय चांगल्‍या  प्रकारे केली जाते मुळात मानसिकता नोकरीची असेल तर शेती कधीच फायद्याची वाटणार नाही. परंतू शेती व्‍यवसायच आपल्‍या देशाला संपन्‍नतेकडे नेवू शकतो. संपन्‍न राष्‍ट्राच्‍या निर्मितीत शेतीचा वाटा मोठा असतो हे जगभरातील सर्व संपन्‍न अशा राष्‍ट्रांनी सिध्‍द करुन दाखवलं आहे.

     आजचा युवक आपल्‍या कृतीतून हे चित्र निश्चितपणानं बदलू शकतो इतकी ताकद या पिढीत जरुर आहे.

                                              - प्रशांत दैठणकर

No comments:

Post a Comment