वर्धा,दि.6– अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाएत असून याला कारण वाहन चालकाचा बेजवाबदारपणा असणे. अपघातामुळे अनेकवेळा जीवीत हानी होत असून, अनेक प्रसंगी अपंगत्व सुध्दा येत असते. अपघाताला आळा घालण्यासाठी वाहनचालकांनी सुरक्षित वाहतुकी सोबत मनातील एकाग्रता आणि स्वंयशिस्त पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी याप्रसंगी केले.
पुस्तीकेचे विमोचन करताना जिल्हाधिकारी जयश्री भोज |
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, सहाय्यक परिवहन अधिकारी राजेंद्र निकोसे व पोलीस निरीक्षक शशीकांत भंडारे आदि मान्यवर उपस्थित होते.
वाहन चालविणे सुरक्षित तर जीवन सुरक्षित, असा अभिप्राय देवून जिल्हाधिकारी जयश्री भोज म्हणाल्या की, नागरीकांनी वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघाताच्या प्रमाणात नक्कीच लक्षणीय घट होऊ शकते.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्हाण म्हणाले की, `स्वयंशिस्त हाच पर्याय` या विषयावरील पुस्तकांमध्ये पादचारी, मोटार सायकल चालविण्या-या मुलांना, सायकल स्वारांना , कार, ट्रक चालकासाठी तसेच मोबाईल धारकांसाठी आणि सर्व वाहन चालकासाठी महत्वाच्या सुचना दिलेल्या असून, पावसाळ्यात वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली आहे. सदर्हू पुस्तीका जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत मुलांच्या वाचण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. या पुस्तकामुळे विद्यार्थ्याना वाचणातून मार्गदर्शन मिळून भविष्यात वाहन चालविणे सोयीचे होईल असे ते म्हणाले.
यावेळी अधिकारी उपसिथत होते.
00000
No comments:
Post a Comment