हेटीकुंडी येथे तलावाच्या खोलीकरणामुळे
1 कोटी लिटर पाण्याचा संचय
·
गवळाऊ गाईच्या संगोपणाला सहाय्य
·
जानकी देवी बजाज संस्थेचा लोकोपयोगी
उपक्रम
·
संपूर्ण तलावाचे सहा फुट खोलीकरण
वर्धा,दि.11- ब्रिटीश
काळापासून अस्थित्वात असलेल्या
हेटीकुंडी येथील गौळाऊ गाय संवर्धन केद्राच्या अर्धा किलोमिटर परिसरातील तलावाचे
खोलीकरणामुळे सुमारे 1 कोटी लिटर पाण्याचा संचय क्षमता निर्माण झाली आहे.
हेटीकुंडी येथील गौळाऊ गाय संवर्धन केद्रात 92 गायी
असून गवळाऊ गाय हे वर्धेचे वैभव म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्यात पिण्याच्या
पाण्याची टंचाई निर्माण होत असल्यामुळे या परीसरातील नाला व जुन्या तलावाच्या
खोलीकरणासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे जनकी देवी बजाज संस्थेला केलीली विनंती तात्काळ
मान्य करुन केवळ पंधरा दिवसात नाला व तलावाचे खोलीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
गवळाऊ गायीच्या संवर्धनासाठी व कायम पिण्याच्या
पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी दिड
किलोमिटर लांबीच्या नाल्याचे खोलीकरण पहिल्या टप्यात पूर्ण करण्यात आले. याच
परिसरातील सुमारे अर्धा किलोमिटर असलेला तलाव संपूर्ण गाळाणे भरल्यामुळे या तलावाची
पाणी साठवण क्षमता संपली होती त्यामुळे पावसाचे संपूर्ण पाणी जंगलात वाहून जात
होते.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व या केद्राचे
प्रभारी अधिकारी डॉ. सतिश राजू यांनी हेटीकुंडी येथील पिण्याचा प्रश्न कायम स्वरुपी
सुटावा यासाठी जानकीदेवी बजाज संस्थेचे संचालक कर्नल विनोद देशमुख जिल्हा समन्वयक
विनेश काकडे यांना तलाव खोलीकरणाबाबत
विनंती केली होती. संस्थेने गायीच्या संवर्धनासाठी उपयुक्त असलेले काम विनामुल्य
पूर्ण करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तात्काळ कामाला सुरुवात केली.
तलावातील गाळ व खोलीकरणानंतर दगड व माती काढण्यासाठी पोकलॅड व तीन मोठे ट्रक च्या
सहाय्याने सतत 13 ते 14 दिवस खोलीकरणाचे कार्य पूर्ण केल. या कामावर सुमारे 35
लक्ष खर्च उपेक्षित होता. या खोलीकरणामधून सुमारे 3 हजार 300 ट्रक माती व दगड
काढण्यात आले आहेत. खोलीकरणानंतर तलावात जिवंत पाणी लागले आहे. गावळाऊ गायी सोबत
वन्य प्राण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा या उपक्रमामुळे सुटण्यास
मदत झाली आहे.
गवळाऊ प्रजातीच्या गायीचे संवर्धन व संगोपणासाठी राज्य
शासनाने 1986 मध्ये हेटीकुंडी येथे 324 हेक्टर जागेवर प्रक्षेत्र निर्माण केले. गोवंशातील गवळाऊ हे अधिकृतरित्या नोंदणीकृत झालेले असून संपूर्ण
देशात वेगळी ओळख् आहे. गवळी समाजाने शेतकरी बांधवांनी अत्यंत देखन्या गवळाऊ गोवंशाचे परंपरागत पद्धतीने संरक्षण व संवर्धन केले आहे.
त्यामुळे आर्वी, कारंजा ,सेलू तसेच जिल्ह्याच्या
सिमावर्ती भागात या वंशाच्या गायीचे
अस्तित्व आहे.या प्रजातीच्या गायीचे
संवर्धन अत्यंत आवश्यक आहे.
गवळाऊ गायवर्ग नोंदणी व विकास सहकारी संस्था
स्थापन करुन या संस्थेद्वारे देशी जातीच्या जनावरांचे संरक्षण व संवर्धन करण्यासंदर्भात शासकीय धोरण ठरविणे व प्रस्ताव
सादर करण्याची जबाबदारी ठरविण्यात आली.वर्धा जिल्ह्याचे वैभव असलेल्या गवळाऊ प्रजातीच्या संवर्धनासाठी पशुसंवर्धन आयुक्त
विश्वास भोसले, उपायुक्त डॉ.प्रविण तिखे, जानकी देवी बजाज संस्थेचे कर्नल विनोद
देशमुख, विश्वास सोहणी यांच्या मागदर्शनाखाली तलाव खोलीकरणाचे काम यशस्वीपणे
पूर्ण झाले आहे.
000000
No comments:
Post a Comment